गोंदवले, दि.५- माण तालुक्यातील कॉग्रेसला जिथे जिथे अडवता येईल तिथ तिथं राष्ट्रवादी ने अडवण्याचा प्रयत्न केला असुन आता लोकसभेला याच राष्ट्रवादीला मदत करून आघाडीचा धर्म फक्त आपणच पाळायचा का? असा मुद्दा उपस्थित करत भाजप कडून उभे असलेले रणजितसिंह निंबाळकर हा माझ्या घरातला उमेदवार असल्याचे सुतोवाच करून पुन्हा माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी माढ्याच्या राजकारणात नवीन व्टिस्ट आणली आहे ते म्हसवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
म्हसवड येथिल आनंदीबाई दोशी सांस्कृतिक भवनात म्हसवड व परिसरातील आ. गोरे समर्थक कार्यकर्त्याची बैठक घेवुन मते जाणुन घेतली यावेळी गोरे बोलत होते. यावेळी या बैठकिस कॉग्रेसचे जेष्ठ नेते दत्तोपंत भागवत, माजी नगराध्यक्ष नितीनभई दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ वसंत मासाळ, सौ वैशाली लोखंडे, सौ शोभा लोखंडे, ईश्वरा खोत, माजी नगरसेवक बी एम अबदागिरे, सुरज ढोले, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार गोरे म्हणाले होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातील कोणत्या उमेदवाराला मदत करायची हा सद्या यक्ष प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे कारण इकडे विहिर आहे तर इकडे आड आहे. त्यामुळे कशात तरी उडी मारावीच लागणार आहे. पण पाणी कशात आहे. हे बघुनच उडी मारली पाहिजे. लोकसभा निवडणुका आल्यावर राष्ट्रवादीला आघाडीचा धर्म आठवतो. मात्र लोकसभा निवडणुका झाल्या कि, तालुक्यातील सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादी हि आपली विरोधी असते हिच परिस्थिती राज्यातही आहे. कारण गेल्या निवडणुकीत कॉग्रेस व राष्ट्रवादीचे मिळून सहाच खासदार निवडुन आले होते. यात चार खासदार राष्ट्रवादीचे होते यात कोल्हापुरचे मुन्ना महाडीकांना खासदार करण्याचे काम ज्या बंटी पाटीलांनी केले त्याच कॉग्रेसचे बंटी पाटलांना विधानसभेत पाडण्याचे पाप याच राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीच्या महाडिकांनी केले होते. तर दुस-या खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापुरच्या हर्षवर्धन पाटीलांनी मदत केली. त्याच हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्याचे पाप याच पवारांनी केले. ज्या कॉग्रेस पक्षाने उदयनराजे खासदार व्हावे म्हणुन प्रामाणिक प्रयत्न केले कदाचित राष्ट्रवादीचीच इच्छा नव्हती उदयनराजे खासदार व्हावे परंतू कॉग्रेस पक्षाने पुढाकार घेतला व उदयनराजे यांना खासदार केले. ज्या उदयनराजे यांना खासदार करण्यासाठी जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केले त्याच कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवायचे काम या राष्ट्रवादीने केले. आज गावागातला आपला कार्यकर्ता हा राष्ट्रवादीशी संघर्ष करतोय कॉग्रेसचा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी कुरघोडीना त्रासुन गेला आहे. तरी सुध्दा हे आघाडीचे विष प्यायचे पाप आपण करतोय आम्ही कॉग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने संघर्ष यात्रा काढुन शेतक-यांना कर्जमाफी द्या यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात फिरलो यावेळी कॉग्रेसचे पृथ्वीराजबाबा असतील, विखे पाटील, अशोक चव्हाण असतील अशा सर्व कॉग्रेसच्या नेत्यांनी हि संघर्ष यात्रा काढुन शेतक-यांना न्याय द्यायचे काम केले पण जेव्हा हि संघर्ष यात्रा माण मध्ये आली तेव्हा राष्ट्रवादीने बहिष्कार घातला.
जिल्हा बैंकेच्या निवडणुकीत जयकुमार उभा राहिला तेव्हा अख्ख्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी जयकुमारच्या विरोधात ठाकली काहो एकटा जयकुमार जिल्हा बैंकेत गेला तर काय बिघडल असतं पण जिथ जिथ कॉग्रेसला अडवता येईल तिथ तिथ राष्ट्रवादीने आपल्याला विरोध केला गेल्या लोकसभेला आपण राष्ट्रवादीला मदत केली आणि विधानसभेला हिच राष्ट्रवादी जयकुमारच्या विरोधात उभी राहिली मात्र जयकुमारला थांबवन एवढ सोप नाही हे लक्षात आल्यावर या बारामतीकरांनी काय कला केली बघा कि घराघरात भांडणं लावणे हा त्यांचा धंदाच आहे म्हणा कारण जयकुमार असा ऐकत नाही हे कळल्यावर त्यांनी आमच्याच घरात भांडण लावले पण आमच्या गड्यालाही कळले नाही कि राष्ट्रवादी काय आहे पण आता त्यांनाही कळुन चुकल आहे आता लोकसभेला एकिकडे राष्ट्रवादी आहे यात आघाडीचा धर्म पाळायचा व या बोकडांना खायला घालायचे आणि दुस-या बाजुला तातीवादी भाजप शिवसेना हे आहेत हे तुम्हाला सर्वाना माहिती आहे असे आपल्या पुढे धर्मसंकट आहे आता या लोकाना मदत करायची का नाही दुस-या बाजुला रणजितसिंह निंबाळकर आहेत. रणजितसिंह हे आपला घरातलाच माणुस आहे अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यावा हा यक्ष प्रश्न आहे, मात्र आपली भुमिका जाणुन घेतल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही.
राजकीय
भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा माझ्या घरातला
काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेेंचा गौप्यस्फोट


